अंतर्योग बहिर्योग होणे म्हणजेच त्या ग्रहाची युती होणेच होय. बुध-शुक्राचा अंतर्योग होत असता बुध-शुक्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतात. त्यावेळी त्यांचे शर सूर्यबिंबाच्या व्यासाहून कमी असतील तर बुध-शुक्राची बिंबे सूर्यबिंबाच्या थेट आड येतात. जणू काय ती बुध-शुक्रामुळे झालेली सूर्य ग्रहणेच होत. अशा रीतीने झालेल्या सूर्य ग्रहणाला अधिक्रमण म्हणतात